देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे पक्के घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) राबविण्यात येत आहे. ‘सर्वांसाठी घर’ हे ध्येय लक्षात ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकांना घरे उपलब्ध करून देण्यावर या योजनेत भर दिला जातो. विशेषतः महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग तसेच अनुसूचित जाती आणि जमातींना या योजनेत प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात ही योजना प्रामुख्याने म्हाडा (MHADA) मार्फत अंमलात आणली जाते.
पात्रता निकष
- अर्जदाराच्या कुटुंबात पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश असावा.
- अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशातील कुठल्याही ठिकाणी पक्के घर नसावे.
- अर्जदार ज्या शहरात राहतो ते शहर योजनेच्या निर्धारित यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
- केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ अर्जदार कुटुंबाने घेतलेला नसावा.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार वर्गवारी
- मध्यम उत्पन्न वर्ग – २ (MIG-2): १२ ते १८ लाख रुपये
- मध्यम उत्पन्न वर्ग – १ (MIG-1): ६ ते १२ लाख रुपये
- अल्प उत्पन्न वर्ग (LIG): ३ ते ६ लाख रुपये
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): ३ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- घराच्या मालकीचे कागदपत्र किंवा भाडेकरार
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:
- अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Citizen Assessment विभागात अर्ज करता येतो: https://pmaymis.gov.in/
- किंवा जवळच्या स्थानिक नगरपालिका कार्यालयात किंवा MHADA कार्यालयात संपर्क साधून अर्ज करता येतो.
