देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ८० कोटी गरजू नागरिकांना दर महिन्याला ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. ही योजना २०२८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
पात्रता निकष
१) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे
- केशरी शिधापत्रिका धारक
- अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी
२) पुढील प्रकारच्या व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
- विधवा
- दिव्यांग व्यक्ती
- गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती
- ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक
- ज्यांच्याकडे सामाजिक आधार किंवा उपजीविकेचे साधन नाही अशा एकट्या (सिंगल) स्त्री किंवा पुरुष
३) इतर लाभार्थी
- भूमिहीन शेतमजूर
- अल्पभूधारक शेतकरी
- ग्रामीण भागातील कारागीर
- असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर किंवा कारागीर
- आदिवासी समाजातील कुटुंबे
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जनधन खाते / बँक पासबुक
- रेशन कार्ड
- मनरेगा कार्ड
लाभ कसा घ्यावा?
या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. रेशन कार्डच्या आधारे आपल्या जवळच्या रेशन दुकानातून या योजनेचा लाभ घेता येतो.
